लेखनिक आणि टाळकरी गंगाधरबुवा मवाळ
प्रकृतीने सात्त्विक, शांत, सोशिक आणि प्रेमळ असलेल्या गंगाराम महाजनांना त्यांच्या मवाळ स्वभावामुळे तुकोबांनी ‘मवाळ’ असे नाव ठेवले. तुकोबांच्या आज्ञेवरून त्यांनी सुरू केलेला ‘पांडुरंग उत्सव’ गेली ३७६ वर्षे कडूस गावी अखंड सुरू आहे. मवाळबुवांनी लिहिलेली ६०० पानांचा हस्तलिखित गाथा त्यांच्या वंशजांनी जपून ठेवला आहे.
