तुकोबारायांच्या गाथा प्रकाशनाचा इतिहास
तुकोबारायांच्या अभंगगाथा अनेकांच्या अभ्यास, संशोधनाचा विषय झाला आहे. जिज्ञासू भक्तांपासून विद्वानांपर्यंत हे अभंग अनेकांचा श्वास बनले आहेत. त्यामुळे इंद्रायणीत बुडविलेले तुकोबांचे अभंग आजही पंडितांपासून भोळ्या भाविकांच्या हृदयात तरंगत आहेत. त्यातूनच गाथेचे पुन्हा-पुन्हा संपादन-प्रकाशन होत आलेले आहे.
– तळाशीकर गुरुजी